Wednesday, December 23, 2009

ध्यानाचे तारांगण भाग:२

ध्यान काय आहे? ध्यान म्हणजे काय?.....
"लक्ष कुठे आहे? मी काय सांगतोय तिकडे ध्यान दे आणि लक्ष्यात ठेव"
आता हे अस बोलण आपण सहज ऎकतो व बोलतो सुध्दा.यात सहजता असल्याने जे सहज तेच बोलले जाते.अर्थ लावताना बरोबरच लावला जातो. पण जेव्हा फ़क्त ध्यान हे शब्द आपण ऎकतो, तेव्हा गोंधळ उडतो. का? कारण कार्य कारण भाव प्रकट अर्थाने प्रगट झालेला नसतो.जरा सोप्या भाषेत सांगायचे तर जेव्हा कोणी तरी "इकडे लक्ष दे" अस म्हणते,तेव्हा ते वाक्य म्हणणारी व्यक्ती काहीतरी सांगणार/करणार हे गृहीत धरुन आपण आपले लक्ष/ध्यान तिकडे केद्रित करतो किंवा देतो.इथे क्रिया घडणार हे गृहीत व प्रकट स्वरुपात असते. हेच जेव्हा अप्रगट स्वरुपात असते, तेव्हा मात्र आमचा गोंधळ होतो.व नेमके काय करायचे ते लक्ष्यात येत नाही? व सोप्पी गोष्ट कठीण हॊउन जाते.
आता आपल्या लक्ष्यात आले असेल कि नेमके काय होते आहे? नाही... ठीक आहे.अजून समजून घेऊ.
आपण लक्ष्य देतो म्हणजे काय करतो? तर आपल्या जाणीवा ग्रहणशील करून तिव्र करतो.म्हणजे समोरचा(विनंती करणारा)काहीतरी करेल/सांगेल ते ग्रहण करण्यास,बघण्यास किंवा ऎकण्यास तयार होतो किंवा उत्कंठीत होतो.हीच ध्यानाची तयारी.आता याला काही आसनाची गरज नाही,विशिष्ट पोज किंवा स्थितीची आवश्यकता नाही.नंतर घडते ते ध्यान.म्हणजे लक्ष्यपुर्वक ऎकणे/बघणे किंवा काही घड्ण्याची वाट बघणे, होईल ते पहाणे,ऎकणे.इथे आपण फक्त बघतो/ऎकतो म्हणजे घडणारया घट्नेचे साक्षिदार किंवा साक्षी असतो.हाच साक्षीभाव.आणि महत्वाचे म्हणजे घट्ना घडून पुर्ण होई पर्यत वाट बघतो व साक्षी भावात साक्षीदार असतो. हीच साधना.घटनेच्या पुर्णतेची जाणीव होई पर्यत साक्षीदार/साक्षीभावात असणे व न कंटाळता बघत असणे हेच साधनेचे तप.
अजुन उदाहरणाने हीच गोष्ट समजून घेउ....पण पुढच्या भागात.
भवतु: शुभम: मंगलम।
इति अद्वैतानंद उवाच।

Monday, December 21, 2009

ध्यानाचे तारांगण भाग:१

"पोराच ध्यान काही ठिकाणावर नाही, बर का?" या लहानपणी शेजारयाने आई जवळ केलेल्या चुगलयापासून तर "कुठे ध्यान लागलय आज?" या ऒफ़ीस सहकारयाच्या शेरयापर्यंत प्रत्येकाचा ध्यानाशी संबंध असतो.एवढा हा रोजच्या गोष्टीशी संबधीत विषय, एखाद्या भगव्या रंगाचे कपडे घातलेल्या माणसाने सांगीतला की गंभीर होउन जातो. का? तर त्याला आध्यात्मिक जोड मिळते व चेहरा आपोआप गंभीर होतो."काहीतरी नक्कीच विषेश आहे बर का !,ते मोठे योगीपुरुष आहेत.त्यांनी एवढेतेव्हडे वर्ष हिमालयात घालवलीत बर का, आणी मग त्यांना अलानीफ़लानी सिद्धी प्राप्त झालीय","आता ते मोठे समाज कार्य करीत आहे""योगावर,ध्यानावर व्याख्यान देतात" "वर्ग घेउन शिकवीतात,अगदी कोर्सवेअरपण देतात,सी.डी.आणी काही पुस्तक,हो त्यांनीच लिहलीय,खुपच मोठे महापुरुष आहेत हो" चर्चा एथेच थांबत नाही, तर "तो आमचा मावस-चावट़़़़़ नात्यातला आहेना तो त्याच्या कार्यात खुप आहे हो.अगदी संसारसोडून तेच फ़ूलटाईम करतोय."
आता ही चर्च्याएकून काय वाटेल,कोणी ध्यान करायला जाईल? निदान माझ्यासारखा अतीसामान्य माणूस तरी नाही.कारण? भीती...घर,संसारसोडून बापरे! नको नको ते नकोच.
आज विचारप्रदूषण ऎवढे आहे कि अगदी रोजच्या जिवनाविषयी माणूस शुध्दविचार करू शकत नाहीय.शुध्दविचार करण्याची पात्रता गमावून बसल्याने,विवेक [जो की जिथून आतला (आत्म्याचा) आवाज येईल असे]गमावून बसलाय.आता गंम्मत अशी कि पुर्वजांनी लिहीलेले द्न्यान हे संस्क्रुतात लिहले.ही भाषा सामान्यांना न कळ्णारी.त्यात ती अलंकारीक,त्यांमुळे समजण्यास कठीण.मग भाषांतर कसे होणार?समजा झाले तर शुध्द कितपत? इथून पुढे सुरु होते ती एक शोकांतिका.भरकट्लेली शब्दांकने,शब्दार्थाने नटलेले फ़सवे लेख व ’न’ करणारयाची नकार घंटा.
धन्यवाद आमच्या पुर्वजाना, त्यानी ञान अबाधीत राखाण्यासाठी एक राज मार्ग अजून राखुन ठेवलेला होता,तो म्हणजे गुरुपंरपरा.
काहीसा कुतुहलचा, गुप्त(सहज न समजणारा), बराच बदनाम व खुपच प्रसिध्द असा.शुध्द ञान हे कोणीच कोणाला देवू शकत नाही, कारण ते अपौरुषेय(स्वयंभु) आहे.पण ते मिळण्याची व्यवस्था होवू शकते.वेळ आली कि कोणीतरी येतं आणि गुरुपर्यंत घेवून जात.पुढे पुढे गुरुअभ्यास पुर्ण झाला कि ते आपोआप प्रकट होवु लागत.आता "ज्याची जशी आवश्यकता आहे त्याचा तसा पुरवठा" हे ब्रम्हवाक्य(अबाधीत) असल्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो.
हे कस होत? केव्हा होत? सुरुवात कशी करायची? कुठुन करायची?अजुन काही लागेल काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पुढील शब्दप्रवासात मिळ्तीलच.फ़क्त सबुर आणी श्रध्देची आवश्यकता आहे.ती असली म्हणजे सुरुवात होइलच,नसली तरी निरशेचे कारण नाही.फ़क्त करण्याचे कष्ट घ्या.इच्छापुर्ण होइलच.कारण प्रत्येक कर्माला फ़ळ असतेच.क्रियेला प्रतिक्रिया ही असतेच.
भवतु शुभम: भक्ताना: .....सर्वाना:
इति: सदगुरुचरणरज अद्वैतानंद.